महायुतीच्या नारायण राणे यांच्या विजयाची औपचारिकता बाकी
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जल्लोषात पार पडली. गतवेळीपेक्षा यावेळी मतदारांचा उत्साह कमी होता तरीही मतदानाचा अर्धा टक्का वाढला आहे. सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण हे मतदारसंघ नारायण राणे यांना निर्विवाद मताधिक्य देणारे आहेत. तर राजापूर आणि कुडाळ हे दोन मतदारसंघ इंडी आघाडीला पोषक असेल तरी कुडाळमध्ये निलेश राणे यांचा करिश्मा पाहायला मिळणार आहे. राजापूरमध्ये बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खुद्द नारायण राणे, निलेश राणे, प्रमोद जठार यांनी घेतलेली मेहनत महायुतीला इथे ५०-५० टक्केवर आणून ठेवणारी आहे. त्यामुळे उर्वरित चार विधानसभा मिळून नारायण राणे हे कमीतकमी १ लाख मतांनी विजयी होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर काही जाणकार हे मताधिक्य २ लाखाचे असेल असा अंदाज वर्तवित आहेत.
२०१९ च्या लोकसभा मतदानाची टक्केवारी ६१.९९ टक्के इतकी होती. यावेळी ती एकूण टक्केवारी ६२.५२ आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ५० च्या आसपास होता. तो शेवटच्या तीन तासात वाढून ६२.५२ पर्यंत पोहचला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या विधानसभा मतदारसंघातून एकूण ४ लाख ६८ हजार १९९ इतके मतदान झाले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून एकूण ४ लाख ३९ हजार ४१९ इतके मतदान झाले.
चिपळूण विधानसभा – ७६ हजार ७२१पुरुष, ७८हजार ३०६ महिला असे एकूण १ लाख ५५ हजार २७, ५७.४६ टक्के, रत्नागिरी विधानसभा – ८५ हजार ५६४ पुरुष, ८६ हजार ५७४ महिला, इतर १असे एकूण १लाख ७२ हजार १३९, ६०.७१ टक्के, राजापूर – ६७ हजार ४६० पुरुष, ७३ हजार ५७३महिला असे एकूण १ लाख ४१ हजार ३३, ६०.३४ टक्के, कणकवली – ७७ हजार ४७ पुरुष, ७३हजार २७३ महिला असे एकूण १ लाख ५०हजार ३२०, ६६.०१टक्के, कुडाळ – ७३ हजार ३४९पुरुष, ६६ हजार ५०७ महिला असे एकूण १लाख ३८हजार ८५६, ६५.८६ टक्के, सावंतवाडी – ७८हजार ९५८ पुरुष, ७० हजार २८५ महिला असे एकूण १ लाख ४९ हजार २४३, ६६.४९ टक्के,. लोकसभा मतदार संघातील एकूण १४ लाख ५१ हजार ६३० मतदारांपैकी ९ लाख ७ हजार ६१८मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ही एकूण टक्केवारी ६२.५२ आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या विधानसभा मतदारसंघातून एकूण ४ लाख ६८ हजार १९९ इतके मतदान झाले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून एकूण ४ लाख ३९ हजार ४१९ इतके मतदान झाले. आता या आकडेवारीवरून जिंकणारा उमेदवार हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती मताधिक्य घेतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे. सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण हे मतदारसंघ नारायण राणे यांना निर्विवाद मताधिक्य देणारे आहेत. तर राजापूर आणि कुडाळ हे दोन मतदारसंघ इंडी आघाडीला पोषक असेल तरी कुडाळमध्ये निलेश राणे यांचा करिश्मा पाहायला मिळणार तर राजापूरमध्ये बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खुद्द नारायण राणे, निलेश राणे, प्रमोद जठार यांनी घेतलेली मेहनत महायुतीला इथे ५०-५० टक्केवर आणून ठेवणारी आहे. त्यामुळे उर्वरित चार विधानसभा मिळून नारायण राणे हे कमीतकमी १ लाख मतांनी विजयी होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.




