• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, June 1, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

शिवसेनेच्या सर्व शाखाप्रमुखांना फणसाच्या कलमांचे वाटप होणार

yogesh by yogesh
June 1, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!

राजापूर : प्रतिनिधी 

पर्यावरण संवर्धनासोबतच कृषी समृद्धीला चालना देण्याच्या उद्देशाने राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिवसेनेच्या सर्व शाखाप्रमुखांना फळशेतीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी पाच फणसाच्या कलमांचे वाटप करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवार, दि. २ जून रोजी पाचल येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विशेष कार्यक्रमातून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले यांनी दिली.या कार्यक्रमात स्थानिक हवामानाला पूरक आणि भविष्यात चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या दर्जेदार फणस कलमांचे वितरण करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच फळशेतीचा प्रसार करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

केवळ घोषणा करून पर्यावरणाचे संरक्षण होणार नाही, तर प्रत्येकाने प्रत्यक्ष कृतीतून त्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. शाखाप्रमुख हे तळागाळातील जनतेशी थेट जोडलेले असतात. त्यांनी स्वतःच्या शेतात किंवा अंगणात ही झाडे लावून फळशेतीचा आदर्श निर्माण केल्यास त्याचा सकारात्मक प्रभाव संपूर्ण गावावर पडेल. – आ. किरण सामंत 

सध्या वाढती जंगलतोड आणि पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल ही चिंतेची बाब बनली आहे. त्याचवेळी शेतीतील वाढता खर्च आणि कमी उत्पन्न यामुळे युवा पिढीचा शेतीकडे असलेला कल कमी होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना निसर्ग आणि शेतीशी जोडणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून पर्यावरण संवर्धन आणि कृषी विकासाचा समन्वय साधणारा हा उपक्रम आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: किरण सामंतराजापुरहरित मतदारसंघ
ShareSend
Previous Post

असा रोजगारच नको जो भविष्यातील पिढी उध्वस्त करेल!

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
रत्नागिरीत २७ एप्रिल रोजी गो-सन्मान पदयात्रा
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत २७ एप्रिल रोजी गो-सन्मान पदयात्रा

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us