भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांचा उपोषणाचा इशारा
रत्नागिरी : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी माझी बहिण योजना योग्य रीतीने राबविली जात असून या योजनेबाबत रत्नागिरी तालुक्यातील बहिणींची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसह शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य जनता ही वारंवार तहसीलदार कार्यालयात जात असते. परंतु रत्नागिरी तहसीलदार कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे कामात कुचराई करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर आक्रमक झाले आहेत.पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांची चौकशी होऊन त्यांचेवर कारवाई व्हावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ ऑगस्ट रोजी उपोषण केले जाईल, असा इशारा निवळकर यांनी दिला आहे. निवळकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. तेव्हा त्यांच्यासोबत भाजपचे युवा नेते सागर खेडेकर उपस्थित होते.
निवळकर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी माझी बहिण योजना योग्य रीतीने राबविली जात असून या योजनेबाबत रत्नागिरी तालुक्यातील बहिणींची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसह शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य जनता ही वारंवार तहसीलदार कार्यालयात जात असते. परंतु रत्नागिरी तहसीलदार कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे कामात कुचराई करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक लोक रेशनकार्डसाठी या कार्यालयात गेल्यास तेथील काही कर्मचारी रेशनकार्डवर चुकीचे नाव घालून तर कधी नवीन रेशनकार्डसाठी उत्पन्नाचा दाखला घेऊन या तसेच कधी कधी पुरवठा विभागात फक्त दोनच कर्मचारी असल्याची कारणे सांगून त्यांची कामे टाळत असल्याचे दिसून येत आहे. पुरवठा विभागाने नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी लोकांची जुनी रेशनकार्ड जमा करून घेतलेली आहेत. वनवीन रेशनिंग कार्डसाठी आवश्यक असलेली वेगवेगळी कागदपत्रे घेऊन या, व यापूर्वी ज्यांनी कागदपत्रे जमा केलेली आहेत ती कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगून, सर्वर काम करीत नाही अशी विविध कारणे सांगून वयोवृध्द व्यक्तीना वारंवार तहसीलदार कार्यालयाच्या फेन्या मारायला भाग पाडत आहेत. यातून हेच दिसून येते की तेथे काम करणारे अधिकारी, कर्मचारी दिवसाला किती लोकांची रेशन कार्ड देतात ? असा प्रश्न नक्कीच उत्पन्न होतो. महाराष्ट्र शासन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस उत्तम काम आहेत. तरी रत्नागिरीतील अधिकारी लोकांना फेऱ्या मारायला लावत आहेत. तरी या विषयी आपण लक्ष घालावे. नाहीतर मी स्वत: १५ ऑगस्ट रोजी रत्नागिरीतील सर्व नागरिकांना घेवून उपोषणाला बसणार आहे.




