• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home साहित्य

मन आणि मनांतरे

yogesh by yogesh
May 31, 2024
in साहित्य
A A
0

व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे आपल्या मराठीत. प्रसंग एकच पण त्याविषयी मनात उमटणाऱ्या भावना या माणसागणिक बदलतात….
अनेक घटना आपण आठवून पहा. एका अंगाने तिच्याकडे पाहता ती आनंददायी, यशस्वी अशी वाटते तर तिच घटना दुसऱ्या अंगाने अगदी विरुद्ध भावना उत्पन्न करते. म्हणूनच म्हणतात की संकटकाळीच खऱ्या मित्राची परीक्षा होते. ” सुख के सब साथी, दुःखमे न कोई ” असं उगाच का गायलंय!
सुखाच्या, आनंदाच्या, यशाच्या, मिळकतीच्या क्षणी अनेक जण जवळ येतात. वाहवा करतात, अगदी गुळाला मुंगळे चिकटावेत तसे. तसंच या यशात वाटेकरी होणारेही असतात. हे यश आमच्यामुळेच कसे मिळाले हे वाढवून फुगवून सांगणारेही असतात.
आणि अगदी त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला जो अयशस्वी किंवा पराजित झालेला आहे त्याच्या भोवती सुद्धा मुंगळे असतातच पण ते डंख मारतात. द्वेषाचे विष कालवतात मनात.
अनेक वेळा आपले कौतुक करणारी व्यक्ती ही आपली आप्त, मैत्र आहे की केवळ जिभेवर साखर आणि मनात हलाहल असलेली आहे हे ओळखणे अतिशय कठीण असते. अशी मायावी मने आपल्या आजूबाजूस खूप असतात. ती पारखता येणं हे एक कसब आहे. मात्र हे कसब अंगी बाणवायाला बराच काळ जावा लागतो. अनेक टक्के टोणपे, अनेक घाव, अनेक जखमा, अनेक व्रण सोसावे लागतात.
एवढे करूनही अनेकदा अशी व्यक्ती आपण ओळखली तरी आपण काहीही करू शकत नाही.एक तर आपला स्वभाव भिडस्त असतो किंवा ती व्यक्ती प्रभावशाली असते किंवा दगडावर डोकं आपटून घेऊन काही उपयोग नाही हे आपल्याला माहीत असतं.
पण ही वृत्ती काही एका दिवसात निर्माण होत नाही. ती हळूहळू वाढते. अनेकदा अभिनंदन करतानासुद्धा शालजोडीतले मारणारे असतात. पण हा विचार करत नाहीत की कोणी असंच आपल्याशी वागलं तर?
अनेकदा काय होतं की समोरच्याचं यश मान्य करण्यासाठी आवश्यक असलेला मनमोकळेपणा आपल्याकडे नसतो. म्हणावं ना की बाबा आहेस तू श्रेष्ठ, वरचढ, कार्यकुशल वगैरे वगैरे. काय बिघडलं? पण नाही माझ्यातला अहंकार मला तसं करण्यापासून रोखतो आणि आपल्या अपयशाला परिस्थिती कशी जबाबदार आहे आणि तो कसा शिरजोर आहे हेच बऱ्याचदा घोकल जातं.

पण अनेकदा एक व्यक्ती म्हणून विशेषतः एक आई म्हणून मला नेहमी वाटतं की आपण आपल्या बाळाला वाढवतानाच असं वाढवलं तर? की जेणेकरून दुसऱ्याचा आनंद त्याला आपला वाटला पाहिजे किमानपक्षी तो नावडता किंवा क्लेशदायक तरी वाटू नये. गुणग्राहकता, श्रमसंस्कार या गुणांची जोपासना बालपणापासूनच जर केली (म्हणजे जर करू शकलो ) तर वाह काय सुरेख असेल तो समाज! जणू काही
” अवघा रंग एक झाला,
आप पर भेद नाही उरला,
सकळ मेळोनिया केला परमानंद …”
-उमा जोशी

Tags: तुमच्या माझ्या मनातलंमन
ShareSend
Previous Post

जि. प. शाळेतील २० जणांची ‘नासा’ साठी निवड

Next Post

पंतप्रधान मोदी ४५ तास अन्नाच्या कणालाही शिवणार नाहीत!

yogesh

yogesh

Related Posts

साहित्य

प्रा. सनगरेंची कविता निसर्गभान देणारी : डॉ. चित्रा गोस्वामी

July 15, 2024
साहित्य

प्राजक्त…!

July 12, 2024
साहित्य

परिवर्तन

June 29, 2024
साहित्य

२१ जूनचा योगायोग

June 21, 2024
Next Post

पंतप्रधान मोदी ४५ तास अन्नाच्या कणालाही शिवणार नाहीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us