• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Sunday, April 12, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न अखेर साकार

सहा जिल्ह्यांसाठी न्यायाची नवी दारे उघडणार, स्वातंत्र्यदिनी उदघाटन

yogesh by yogesh
August 1, 2025
in माझा महाराष्ट्र
A A
0
कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न अखेर साकार

कोल्हापूर : प्रतिनिधी

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील जनतेच्या ३५ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच (खंडपीठ) चे औपचारिक उद्घाटन होणार आहे. सीपीआर समोरील, पूर्वी कौटुंबिक न्यायालय असलेल्या इमारतीत हे खंडपीठ कार्यरत होणार आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे सहा जिल्ह्यांतील नागरिकांसाठी न्यायदानाची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि खर्चिकदृष्ट्या परवडणारी ठरणार आहे. १८ ऑगस्ट २०२५ पासून हे खंडपीठ प्रत्यक्ष कामकाज सुरू करणार असून, यासंदर्भातील राजपत्रही प्रकाशित झाले आहे.

या खंडपीठासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्याच मुख्यमंत्री कार्यकाळात यासाठी विशेष लक्ष दिले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, हे खंडपीठ नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा या विद्यमान खंडपीठांमध्ये आता चौथ्या पायरीसारखे जोडले गेले आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई आणि महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश मा. आलोक आराधे यांचे विशेष आभार मानले आहेत.न्यायालयीन प्रक्रिया स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च यामध्ये लक्षणीय बचत होणार असून, न्यायासाठी मोठ्या शहरांमध्ये धावपळ करावी लागणार नाही. या निर्णयामुळे कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील न्यायप्रणालीला नवसंजीवनी मिळणार असल्याचेही प्रशासनातून व्यक्त होत आहे.

Tags: कोल्हापूरखंडपीठरत्नागिरीसिंधुदुर्ग
ShareSend
Previous Post

मुस्तकीम युसुफ मुल्लासह मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकरवर गुन्हा

Next Post

तब्बल दोन कोटीची अंबरग्रीस तस्करी, एजाज मिरकर अटक

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post
तब्बल दोन कोटीची अंबरग्रीस तस्करी, एजाज मिरकर अटक

तब्बल दोन कोटीची अंबरग्रीस तस्करी, एजाज मिरकर अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us