कोकण पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्या महायुतीचे कार्यकर्ते जोमात
रत्नागिरी : प्रतिनिधी
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज २६ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. महायुतीच्या निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीच्या रमेश कीर यांच्यात ही लढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरण निवडणुकीचे आहे. मात्र या सर्वात लक्षवेधी गोष्ट ठरली ती कार्यकर्त्यांची बूथ. महायुतीचे मिळून दोन बूथ रत्नागिरी शहरात होते. तर महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर हे स्थानिक असताना इथे एकही बूथ लागला नव्हता. इथे काँग्रेस कार्यकर्ते दिसले नाहीत. किंबहुना उबाठाचे निवडक कार्यकर्ते सोडले तर बूथ असा लागलेला नाही. महायुती म्हणून भाजपसोबत उदय सामंत यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय विविध संघटनांचे प्रतिनिधी महायुतीच्या बुथवर दिसत होते.

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीने जितकी प्रचारात आघाडी घेतली होती. तितकी महाविकास आघाडीने मेहनत घेतल्याचे दिसले नाही. साधारण बूथ लागला की तिथे मतदार येऊन आपली नावे शोधत असतात. त्यातून एक कल समजतो. दुपारी अडीच वाजेपर्यंत हा कल रमेश कीर यांच्या विरोधातील होता. रत्नागिरी शहराचे भूमिपुत्र असताना किर यांचा बूथ लागला नाही, त्यांना प्रचारासाठी मेहनत घेताना कोणी दिसले नाही. महाविकास आघाडी म्हणून प्रचारात एकी दिसली नाही. उबाठा गटाने केलेली नोंदणी पाहता रमेश कीर यांना उमेदवारी देऊन घोळ घातल्याची चर्चा त्यानिमित्ताने रंगली होती. किमान रत्नागिरी शहरात तरी बूथ लागणे अपेक्षित होते. मात्र शहरात सोडा संपूर्ण मतदारसंघात बूथ कमी लागले. त्यामानाने डावखरे यांचे बूथ सर्वाधिक होते.
महायुती म्हणून भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपिन बंदरकर जातीनिशी लक्ष घालत होते. महायुती म्हणून रत्नागिरी शहरात आज माहोल दिसला. त्याचे फलित निकालात दिसेल, यात शंका नाही. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत हे दोघेही वेळोवेळी आढावा घेत होते. त्यामुळे महायुती म्हणून रत्नागिरीत भगवे वातावरण होते.




