• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

छ. शिवाजी महाराजांच्या मंदिर भत्त्यामध्ये वाढ करा

हिंदू राष्ट्र समन्वय समितीची रत्नागिरीत मागणी

yogesh by yogesh
September 11, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
छ. शिवाजी महाराजांच्या मंदिर भत्त्यामध्ये वाढ करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी सरकारकडून प्रतीमासाला केवळ २५० रुपये इतका तुटपूंजा भत्ता दिला जात आहे. छत्रपती शिवराय नसते, तर महाराष्ट्राची भूमी आक्रांतांच्या ताब्यात असती. शिवरायांनी महाराष्ट्राच्या भूमीचे आणि येथील संस्कृतीचे प्राणपणाने रक्षण केले. त्यासाठी उभे आयुष्य वेचले. अशा राष्ट्रपुरुषांच्या मंदिरासाठी प्रतीमास केवळ २५० रुपये देणे, ही गोष्ट शासनासाठी शोभनीय नाही. सध्याच्या महागाईच्या काळात एवढ्या अल्प भत्त्यामध्ये मंदिरात दिवा बत्ती करणे, वीजदेयक भरणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आदी प्राथमिक आणि अत्यावश्यक गरजांचीही पूर्तता करणे शक्य नाही. त्यामुळे ऐतिहासिक ठेवा असलेल्या छत्रपती शिवरायांच्या मंदिरासाठी दिल्या जाणाऱ्या भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे.

हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. चंद्रकांत सूर्यवंशी यांना नुकतेच रत्नागिरी येथे देण्यात आले. यावेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. गणेश गायकवाड, कु. अंकिता राजेशिर्के, श्री. अरविंद बारस्कर, श्री. छगनलाल छिपा, श्री. मांगीलाल माळी, श्री. संजय जोशी आदीउपस्थित होते. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी वर्ष १६९५ मध्ये महाराष्ट्रातील एकमेव असलेले हे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाचे ठसे आजही जतन करून ठेवण्यात आले आहेत. अशा या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोचवून हे ठिकाण पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. या मंदिरासाठी शासनाकडून प्रतीवर्षी २ सहस्र १०० रुपये इतका दिला जाणारा वार्षिक भत्ता वर्ष १९७०-७१ पासून वाढवून ३ हजार रुपये इतका करण्यात आला; मात्र यानंतर या भत्त्यामध्ये वाढ केल्याची नोंद सापडत नाही.

शिवरायांच्या मंदिराच्या ठिकाणी शिवरायांच्या कार्याची माहिती देणारे फलक, ग्रंथालय, ऐतिहासिक ठेवा, चित्राच्या स्वरूपात इतिहासाची मांडणी केल्यास या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांमध्ये पर्यटनासह त्यांच्यात राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. पर्यटन विभाग, शासनाचे प्रतिनिधी, तसेच इतिहासतज्ञ यांनी एकत्रितपणे मंदिराची पहाणी करून मंदिराचे जतन आणि शिवरायांच्या कार्याची माहिती देण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण आराखडा निश्चित करावा. यासाठी आवश्यक तो निधी सरकारकडून देण्यात यावा आणि कालमर्यादा निश्चित करून हे काम पूर्ण करण्यात यावे. यासंदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी पाठपुरावा केला होता; मात्र अद्याप त्याची कार्यवाही झालेली दिसत नाही. संबंधित खात्याला या संदर्भात आदेश देण्यात यावेत, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

Tags: छ. शिवाजी महाराजमंदिर भत्ता
ShareSend
Previous Post

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या २५५३ फेऱ्यांचे नियोजन

Next Post

रत्नागिरी जिल्ह्यात आज १ लाख बाप्पांचे विसर्जन

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
रत्नागिरी जिल्ह्यात आज १ लाख बाप्पांचे विसर्जन

रत्नागिरी जिल्ह्यात आज १ लाख बाप्पांचे विसर्जन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us