२० हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
९ कोटी २६ लाख शेतकरी योजनेचे लाभार्थी
तिसऱ्यांदा कारभार हाती घेताच जलद निर्णय
रत्नागिरी : प्रतिनिधी
हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौर्यावळी पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून ९ कोटी २६ लाख शेतकर्यांच्या खात्यात १७ व्या हप्त्याअंतर्गत २० हजार कोटींचा निधी हस्तांतरित केला. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हा निधी पोहचला असून मोदींची गॅरंटी सत्यात उतरली आहे. मोदींनी जी जी आश्वासने दिली ती पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. शेतकऱ्यांना थेट निधी त्यांच्या खात्यात मिळेल, हे दिलेले आश्वासन किसान सन्मान योजना सुरू झाल्यापासूनच पूर्ण केले आहे.
पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी मोदी यांनी बळीराजाच्या निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. शपथ घेतल्यानंतर मोदी आपल्या मतदारसंघात प्रथमच आले होते. यावेळच्या सोहळ्यात मोदी यांच्या हस्ते शेतकर्यांच्या खात्यामध्ये हा निधी वर्ग करण्यात आला. यानंतर मोदी यांनी स्वयंसहाय्यता गटातील ३० हजार कृषी सखींना प्रमाणपत्राचे वाटप केले.
पंतप्रधानपदाची तिसर्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदींनी त्वरित शेतकर्यांच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी केली. यावेळी मोदी म्हणाले, शेतकर्यांचे कल्याण हेच आमच्या सरकारचे ब्रीद आहे. यापुढील काळात शेतकर्यांसाठी खूप काम करायचे आहे. कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करायच्या आहेत. त्यामुळे आपल्या तिसर्या कार्यकाळात बळीराजाच्या हितासाठी मोठे योगदान देण्यात येणार आहे. शेतकरी, युवा, महिला आणि गरिबांच्या कल्याणसाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे शेतकरी आणि गरिबांच्या फाईलवर स्वाक्षरी केली. गरिबांना तीन कोटी नवीन घरे बांधून देण्यात येणार आहे.





