• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार माकड वानरांची प्रगणना

yogesh by yogesh
May 23, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी
माकड, वानर यांचा शेतकऱ्यांना होणारा उपद्रव, शेतीचे मोठे नुकसान या पार्श्वभूमीवर वनखात्यामार्फत रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यात दि. २६ ते ३० मेपर्यत वानर, माकड यांची संयुक्त प्रगणना मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत गावांतील युवक, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जाणार आहे. प्रगणनेच्या कामी कृषी विभागालाही सहभागी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या मोहिमेसाठी वनखात्याच्यावतीने युवकांना एक दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वनविभाग रत्नागिरी,(चिपळूण) यांच्यामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील उपद्रवी वानर व माकड यांची प्रगणना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे. या मोजणीसाठी स्वंयसेवी संस्था, विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ यांची मदत आवश्यक आहे. याकरिता लोकांना मोजणीपूर्वी एक दिवसाचे ट्रेनिंग देण्यात येईल. तसेच मोजणी कामात सहभागी लोकांना वन विभागामार्फत सर्टिफिकेट देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक प्राप्त होताच कळविण्यात येईल. कोकणात विशेषत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांत माकड, वानर यांनी शेतीचे मोठे नुकसान केले आहे. नारळी, फोपळी, हंगामी भाजी पाला यांचे मोठया प्रमाणात माकड ,वानर कडून नुकसान झाले आहे लांजा, रत्नागिरी ,राजापूर, चिपळूण, गुहागर, दापोली आदी तालुक्यातील अनेक गावांत वानर, माकड यांचे कळप पाहवयास मिळतात. काही वर्षांत माकड संख्यावाढ झाली आहे. कोकणातील शेतकरी यांनी अनेक वर्षे माकड ,वानर यांच्यापासून नुकसान भरपाई आणि बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी यांच्या या मागणीची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत.

Tags: प्रगणनामाकडरत्नागिरीवानरसिंधुदूर्ग
ShareSend
Previous Post

रत्नागिरी पोलीस खरंच धृतराष्ट्र आहेत काय?

Next Post

पालकमंत्र्यांनी सूचना देताच जिल्हाधिकारी लागले कामाला!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post

पालकमंत्र्यांनी सूचना देताच जिल्हाधिकारी लागले कामाला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us